Saturday, October 15, 2011

सोशल सायकॉलॉजी

August 07, 2011

खाद्याच्या भावना, प्रेरणा आणि वागणूक अशा सगळ्या गोष्टी इतरांमुळे कशा बदलतात, त्यांचा त्याच्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास म्हणजेच "सोशल सायकॉलॉजी'.

गॉर्डन ऍलपोर्ट याच्या मते, प्लेटो हा सोशल सायकॉलॉजीचा जनक म्हटला पा हिजे. त्यानंतर ऍरिस्टॉटल, हॉब्ज, बेंथम, ऑगस्ट कॉम्ट, हर्बर्ट, स्पेन्सर वगैरे अनेकांनी याविषयी विचार केला होता. 1987 मध्ये सोशल सायकॉलॉजीवर प हिला प्रयोग नॉर्मन र्टिप्लेट यानं केला. सायकल चालवताना एखाद्याबरोबर इतरही कोणी सायकल चालवत असेल तर तो नेहमीपेक्षा जास्त भरभर सायकल चालवतो, याचं त्यानं निरीक्षण केलं होतं. यावर त्यानं वेगवेगळ्या तऱ्हेनं प्रयोगही केले, पण आधुनिक सोशल सायकॉलॉजी ही गेल्या शतकापासूनच सुरू झाली. कार्ट लेव्हिन या बर्लिन विद्यापीठातल्या जेस्टाल्टिस्टनं याचा पाया घातला. यानं तर 1950 आणि 1960 च्या दशकात जवळपास सगळ्याच अमेरिकन विद्य ापीठात सोशल सायकॉलॉजी हा विषय शिकवला जायला लागला.

सॉलोमन ऍश (1907-1996) या जगप्रसिद्ध जेस्टाल्ट मानसशास्त्रज्ञानं इतर लोकांच्या थोड्याशा दडपणामुळेही माणूस आपली मतं कशी बदलतो हे सिद्ध करण्यासाठी 1950 मध्ये एक प्रयोग केला. या प्रयोगात ऍशनं आठ लोकांचा एक गट केला. त्यातले सात जण हे मानसशास्त्रज्ञांनी निवडलेली त्यांची खास माणसं होती! ती विचारलेल्या प्रश्‍नांना हळूहळू चुकीची उत्तरं देणार होती आणि त् याचा आठव्या माणसावर (प्रयुक्तावर) काय परिणाम होतो, हे त्या मानसशास्त्रज्ञांना बघायचं होतं. पण या सर्व योजनेविषयी प्रयुक्ताला काहीच माहीत नव्हतं. ऍशच् या या प्रयोगातून खूपच गंमतशीर निष्कर्ष निघत होते. आजूबाजूच्या लोकांची उत्त् ारं जसजशी बदलत गेली तसतसं प्रयुक्ताचं उत्तरही बदलत गेलं. आपलं उत्तर इतरांशी न जुळल्यामुळे आपली चेष्टा होईल, या भीतीपोटी त्याची उत्तरं बदलत होती. ऍशचे प्रयोग मानसशास्त्रात प्रचंड गाजले. यानंतर त्यासारखेच अनेक प्र योग अनेक वर्षं होत राहिले.
1971 मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या फिलीप डिम्बार्डो याच्या नेतृत्वाखाली "स्टॅ नफर्ड मॉक प्रिझन एक्‍स्परिमेंट' हा प्रयोगही प्रचंड गाजला. त्या काळी पाश्‍चिमात्य देशांत तुरुंगांमध्ये कैद्यांनी केलेल्या दंग्यांचं प्रमाण खूपच वाढलं होतं. तुरुंगातले कैदी, त्यांच्यावर हुकुमत गाजवणारे गार्डस्‌ आणि तुरुंगातले नियम या तिघांपैकीच कुठेतरी चूक होत असली पाहिजे, असं तज्ज्ञांना वाटत होतं.

यापैकी खरं कारण शोधण्यासाठी झिम्बार्डोनं एक प्रयोग केला. त्यासाठी त्यानं स्टॅ नफर्ड विद्यापीठातच चक्क एक भयानक प्रतितुरुंग (मॉक प्रिझन) बनवला. या तुरु ंगात कैदी आणि गार्डस्‌ म्हणून काम करण्यासाठी त्यानं वृत्तपत्रात चक्क जा हिरातही दिली. या मॉक प्रिझनमध्ये काम करणाऱ्यांना रोज 15 डॉलर याप्रमाणे रोजगारही मिळणार होता. जवळपास 75 अर्जदारांपैकी झिम्बार्डोनं 24 लोकांची निवड केली. भरती करताना ते भावनिकदृष्ट्या स्थिर, कायदा पाळणारे, शांत स् वभावाचे आहेत, याविषयीची खात्री करून घेतली होती. निवडलेल्या लोकांचे 12-12 जणांचे दोन गट त्यानं केले. एका गटातले लोक कैदी, तर दुसऱ्या गटातले लोक गार्डस्‌ झाले. या प्रयोगांच्या दरम्यान त्यांना खूप तणावपूर्ण आणि कठीण परिस्थितीतून जायचं असल्याचं त्यानं सगळ्यांना बजावलं होतं. कोण कुठल्या गटात जाईल हे चक्क नाणेफेक करून ठरवलं होतं. स्वतः झिम्बार्डो जेल सुपरिंटेंडंट झाला.

प्रयोगाची सुरवात होईपर्यंत कैद्यांना आपापल्या घरीच थांबायचं होतं. त्यानंतर गाडर् स्‌ झालेल्या पोलिसांनी अचानकपणे त्यांच्या घरावर धाड टाकून कैद्यांना पकडलं, त्यांच्यावर दरोडे आणि चोरीचे आरोप ठेवले आणि त्यांना तुरुंगात आणलं. आता खरा प्रयोग सुरू झाला. खऱ्या कैद्यांप्रमाणे याही कैद्यांचे हातांचे ठसे घेऊन, त्यांना दरडावून, धमकावून त्यांच्यावरच्या आरोपांचं वाचन झालं, आणि मग त्यांना जेलमध्ये कैद केलं. तुरुंगात आणताना कैद्यांचे पूर्ण कपडे काढून तपासणी करणं, त्यांना बेड्या घालणं, त्यांच्याकडल्या सगळ्या चीजवस्तू काढून घेणं, हे सगळं अगदी रीतसर झालं. गार्डस्‌ झालेल्या लोकांना खऱ्या गार्डस्‌सारखेच खाकी पोशाख, लाकडी बंदुका, शिट्ट्या, दंडुके वगैरे साहित्य देण्यात आलं. कैद्यांना कोणतीही शारीरिक शिक्षा करू नये, अशी अट झिम्बार्डोनं सगळ्या गार्डस्‌ना घातली. गार्डस्‌नी तुरुंग कसा सांभाळायचा याविषयीच्या दहा नियमांची यादी चटकन बनवली. कैद्यांनी ठराविक वेळीच खायचं आणि जेवताना कोणाशीही बोलायचं नव्हतं. कैद्यांना त्यांच्या नावाऐवजी नंबरांप्रमाणे पुकारलं जावं असे ते नियम होते. कोणीही नियम तोडल्यास त्याला शिक्षा मात्र होणार होती. प्रयोगाच्या दरम्यान झिम्बार्डोनं गार्डस्‌ लोकांना कैद्यांच्या मनामध्ये भीती, नैराश्‍य, कमालीचा कंटाळा या भावना निर्माण झाल्या पाहिजेत; त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं पा हिजे आणि त्यांना दुबळेपणाच्या भावनेनं ग्रासलं पाहिजे, असा आपला हेतू स्पष्ट केला होता. कैद्यांना कुठल्याही तऱ्हेचा एकांत मिळू नये याचीही खबरदारी घेतली होती. बाकी तुरुंग कसा सांभाळायचा, हे झिम्बार्डोनं त्यांच्यावरच सोपवलं. पुढचे 15 दिवस हा प्रयोग सुरू राहणार होता.

प्रयोगाच्या पहिल्याच रात्री अनेक वेळा गार्डस्‌नी जोरात कर्णकर्कश्‍श शिटी वाजवून कैद्यांना सतत जागं केलं. इथे खरी सत्ता कोणाच्या हातात आहे आणि इथे कोणाचा नियम चालतो हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. काही तासांतच कैद्यांना न्यूनगंड येऊन आपणच स्वतः खरंच कुठेतरी कमी आणि वाईट असल्यासारखं वाटायला लागलं. याउलट कैदी कसे बेशिस्त आणि खतरनाक आहेत, असं गार्ड स्‌ना वाटायला लागलं. कैद्यांनाही गार्डस्‌ हे जुलमी, सॅडिस्ट वाटायला लागले. त्यांच्यातले संबंध भराभर बिघडत गेले.

प्रयोगाच्या दुसऱ्याच दिवशी कैद्यांनी तुरुंगातल्या व्यवस्थेच्या विरोधात दंगल केली. सकाळीच त्यांनी आपले गणवेश फाडून टाकले आणि आपले बिछाने आपल्या खोलीच्या दाराकडे ढकलून खोली बंद करून टाकली. त्याबरोबर तिथले गार्डस्‌ खूपच चिडले आणि आणखी तीन राखीव गार्डस्‌ची कुमक मागवली. या दंगलीवर नियंत्रण आणण्यासाठी गार्डस्‌नी फायर एस्टिंग्विशर्सचा वापर केला. शेवटी खोलीत शिरून गार्डस्‌नी त्या कैद्यांना नग्न केलं; त्यांचे बिछाने काढून घेतले आणि त्यांच्यावर खूपच जरब दाखवली. आता कैदी गार फरशीवरच झोपायला लागले. गार्डस्‌नी यानंतर त्यांचे नियम आणखीनच कडक केले. यामुळे एका कैद्याचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडल्यामुळे त्याला तुरुंगातून बाहेर जा ण्याची परवानगी द्यावी लागली! झिम्बार्डोला आणि इतरही अनेक मानसशास्त्रज्ञांना या सगळ्या प्रकाराचं खूपच आश्‍चर्य वाटलं.

सुरवातीला कैदी मंडळी गार्डस्‌कडे गंभीरपणे बघत नसत. आपलं व्यक्तिमत्त्व आणि अभिमान दाखवण्यासाठी त्यांच्या सूचना न पाळणं, त्यांची टर उडवणं, त्या ंना प्रत्युत्तर देणं, असले प्रकार होत असत. पण गार्डस्‌ मंडळींची कठोर आणि शिस्तबद्ध वागणूक बघून कैदी खूपच नरमले होते आणि गार्डस्‌ सांगतील तसं निमूटपणे कवायत करणं, प्रचंड श्रमांची कामं करणं, असं सगळं ते करायला लागले.

कैद्यांची रोजची हजेरी, कवायत या नेहमीच्या गोष्टीही जितक्‍या त्रासदायक करता येतील त्या पद्धतीनं केल्या जात असत. कैद्यांना टॉयलेट्‌स हॅंडग्लोव्ह्‌ज न घालता साफ करायला सांगितले गेले. आता मात्र कैदी खूपच खच्ची होत चालले होते. गार्डस्‌मधलाही सॅडिझम वाढत चालला होता, याचं खुद्द गार्डस्‌नाही आश्‍ चर्य वाटत होतं. आपण पूर्वी किती शांत होतो! आताच असे का वागायला लागलो आहोत, हे त्यांचं त्यांनाच उमगत नव्हतं. झिम्बार्डो आणि कंपनीलाही कै दी आणि गार्डस्‌ यांच्यात इतके झटपट बदल होतील असं वाटलंच नव्हतं. एकदा झिम्बार्डोनं अचानकपणे जाहीर केलं, की सहभागी गार्डस्‌ मंडळींना कसलं ही मानधन मिळणार नाही. पण गमतीचा भाग असा, की तरीसुद्धा त्यातल्या एकानं ही या प्रयोगातून बाहेर पडण्याचं नाव घेतलं नाही.
तिथलं वातावरण सहन न झाल्यामुळे एका कैद्यानं उपोषण सुरू केलं. इतर कैदीही उपोषण करतील असं झिम्बार्डोला वाटलं होतं; पण झालं उलटंच. इतर सगळे कै दी त्या कैद्याला चक्क शिव्या देत होते. त्यांच्यातली एकी आता पूर्णपणे संपली होती. ते कैदी स्वतःला गुन्हेगार आणि शिक्षेला पात्र असंच समजायला लागले होते आणि गार्डस्‌नाही ते कैदी किती वाईट आहेत आणि त्यांना घडा शिकवायलाच पाहिजे, असं वाटायला लागलं होतं.

प्रयोगाच्या सहाव्या दिवशी झिम्बार्डोची प्रेयसी ख्रिस्तिना मॅस्टॅक आणि काही पत्र कार कैद्यांचे आणि गार्डस्‌ मंडळींचे इंटरव्ह्यू घ्यायला आले. त्या वेळी हातकड्या घातलेले कैदी खाली माना घालून गार्डस्‌च्या शिव्या खात खात स्वच्छतागृहां कडे चालले होते. तिथला सगळा प्रकार बघून ती अवाकच झाली आणि तिच्या डोळ्यांत चक्क पाणी आलं. "तू या कैद्यांबरोबर जे करत आहेस ते बरोबर नाहीये,' असं तिनं झिम्बार्डोला सांगितलं. या वेळी मात्र झिम्बार्डोचं हृदयपरिवर्तन झालं आणि शेवटी त्यानं आपला हा प्रयोग आवरता घेतला. 15 दिवसांसाठी म् हणून सुरू केलेल्या या प्रयोगाची सांगता शेवटी 6 दिवसांतच झाली. 20 ऑग स्ट 1971 रोजी हा खेळ अखेर संपुष्टात आला.

या प्रयोगावरून अनेक गोष्टी लक्षात आल्या. कैदी आणि गार्डस्‌ यांच्या वागणुकीतले बदल हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे नव्हे, तर बाह्य परिस्थितीमुळे निर्माण झालेले होते. तुरुंगातलं वातावरण आणि तिथली कार्यपद्धतीच याला कारणीभूत होती, हे झिम्बार्डोच्या लक्षात आलं. झिम्बार्डोला आपला प्रयोग यश स्वी झालाय असं वाटत होतं; पण समाजाच्या दृष्टीनं असे प्रयोग हितकारक नस ल्याची आणि ते अवैज्ञानिक असल्याची त्याच्यावर जोरदार टीका झाली. कॅलिफो र्नियातल्या सगळ्याच तुरुंगांत झिम्बार्डोला प्रवेश नाकारण्यात आला. 1970 च्या दशकात अशा प्रयोगांवर खूप बंधनं आणण्यात आली. पण सोशल सायकॉलॉजि स्ट्‌स मंडळींनी याविरुद्ध बोंबाबोंब करायला सुरवात केली. "असे प्रयोग केल्या शिवाय आपल्याला समाजाविषयी, मनाविषयी आणि मानसशास्त्राविषयी निष्कर्ष कसे काढता येणार?' असा त्यांचा सवाल होता. हा वाद खूपच रंगला. शेवटी 1981 मध्ये अशा प्रयोगांवरची बंधनं पुन्हा शिथिल करण्यात आली; पण अजून त्यावर वाद, चर्चा चालूच आहे.

No comments:

Post a Comment