Saturday, October 15, 2011

'मनात'ला अर्धविराम...

September 25, 2011

मग माणूस काम का करतो? त्याच्यामागच्या प्रेरणा कुठल्या? आज आपल्याला सांगितलं जातं तसं तो फक्त पैशाकरिता काम करतो का? कोट्यवधी माणसं आपल्या मुलांना जन्म देतात आणि वाढवतात ते पैशाकरिता का? सीमारेषेवरचे हजारो-लाखो सैनिक जेव्हा लढता लढता प्राण गमावतात तो पैशांसाठी का? किंवा जीव तळहातावर घेऊन जगाची सफर करणारी, नवनवे प्रदेश शोधणारी साहसी माणसं किंवा अंतराळवीर किंवा निसर्गाचं आणि माणसाचं गूढ उकलण्यासाठी रात्रंदिवस संशोधन करणारे वैज्ञानिक हे काय फक्त पैशाकरिता काम करत असतात का? नवनिर्मितीचा आनंद आणि पाठीवर कौतुकाची थाप ही मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त महत्त्वाची असेल तर पूर्ण समाज सहकारावर का उभा राहू शकणार नाही?

'मनात' या मालिकेचा हा शेवटचा लेख! ही मालिका लिहिताना खूपच मजा आली. एक तर मानसशास्त्र हा विषय खूप वेगळा होता आणि त्यामुळे त्यातले वेगवेगळे सिद्धान्त आणि कल्पना सोप्या भाषेत सर्वांना समजतील अशा तऱ्हेनं पण अचूकपणे लिहिण्याची गरज होती. या भानगडीत वाचनही भरमसाट झालं आणि शिकायलाही भरपूर मिळालं. कॉलेजच्या दिवसांपासूनच मानसशास्त्राविषयी खूप कुतूहल वाटत होतंच. मुख्य म्हणजे माणूस मुळातच स्वार्थी असतो का? मानवी समाज हा स्वार्थावर आणि स्पर्धेवर (कॉम्पिटिशन) उभा आहे का, सहकारावर (कोऑपरेशन) उभा आहे? सहकाराची भावना ही कृ त्रिम आहे; स्वार्थ हाच माणसाचा मूळ स्वभाव आहे आणि प्रत्येकानं स्वार्थानं वागलं तर सगळ्या समाजाचं भलं होईल, अशी थिअरी ऍडम स्मिथच्या काळापासून आजपर्यंत आणि विशेषतः मुक्त अर्थव् यवस्थेमध्ये रोज हजारो वेळा वेगवेगळ्या तऱ्हेनं आपल्या मनावर ठसवली जात होती; पण हे कितपत खरं आहे हे शोधण्यासाठी माणसाच्या मनात आणि त्याच्या इतिहासात डोकावण्याची गरज होती. मानवी इतिहासात बघितलं तर माणसा-माणसात स्पर्धा आणि भांडणं होतीच, पण नैसर्गिक आपत्ती आणि वन्य पशू यांना तोंड देण्यासाठी- थोडक्‍यात, केवळ जिवंत राहण्यासाठी- सहकाराशिवाय पर्याय नाही, असं समजल्यामुळे माणसाची हजारो वर्षं खरं तर सहकारातच गेली. आजसुद्धा स्वार्थाचं आणि स्पर्धेचं तोंड फाटेपर्यंत गुणगान करताना आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना मात्र सहकार म्हणजेच टीमवर्क हे शिकवण्याकरता हजारो मॅनेजमेंटचे महागडे सेमिनार घेतले जातात. मग सहकारावरच उभा असलेला समाज निर्माण होणं का शक्‍य नाही, असे प्रश्‍न डोक्‍यात यायला लागले आणि मग माणूस काम का करतो? त्याच्यामागच्या प्रेरणा कुठल्या? आज आपल्याला सांगितलं जातं तसं तो फक्त पैशाकरता काम करतो का? कोट्यवधी माणसं आपल्या मुलांना जन्म देतात आणि वाढवतात ते पैशाकरता का? सीमारेषेवरचे हजारो-लाखो सैनिक जेव्हा लढता लढता प्राण गमावतात तो पैशांसाठी का? किंवा जीव तळहातावर घेऊन जगाची सफर करणारी, नवनवे प्रदेश शोधणारी साहसी माणसं किंवा अंतराळवीर किंवा निसर्गाचं आणि माणसाचं गूढ उकलण्यासाठी रात्रंदिवस संशोधन करणारे वैज्ञानिक हे काय फक्त पैशाकरता काम करत असतात का? नवनिर्मितीचा आनंद आणि पाठीवर कौतुकाची थाप ही मिळणाऱ्या पैशां पेक्षा जास्त महत्त्वाची असेल तर पूर्ण समाज सहकारावर का उभा राहू शकणार नाही? एवढंच काय, पण आनंद म्हणजे काय? सुख म्हणजे काय? दुःख म्हणजे काय? या भावना प्राण्यांत असतात का? म ाणसांत त्या कशा निर्माण झाल्या? तसंच मनाच्या या सगळ्या व्यापारात, आपल्या भावनांमध्ये, बुद्धीमध्ये आणि मनोविकारांमध्ये आनुवंशिकतेचा (नेचर) प्रभाव किती असतो आणि बाह्य परिस्थिती आणि स ंगोपन (नर्चर) यांचा प्रभाव किती असतो, याविषयीचे विचार मनात घोळायला सुरवात झाली.

याच वेळी एव्हॅल्युशनरी सायकॉलॉजीवरची बरीच पुस्तकं वाचायला मिळाली. त्यातल्या कल्पना तर भन्नाटच होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या सगळ्या भावना या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत तयार झालेल्या आहेत, किंबहुना उत्क्रांतीच्या प्रक्रियेत माणसाचेही जे अनेक प्रकार निर्माण झाले, त्यापैकी ज्या प्रकारांमध्ये अशा तऱ्हेच्या भावना निर्माण झाल्या तेच मानवी जीव तगून राहिले आणि ज्यांच्यात त्या निर्माण झाल्या नाहीत ते मानवी जीव नॅचरल सिलेक्‍शनच्या प्रक्रियेमध्ये नष्ट झाले. उदाहरणार्थ - जर आपल्याला भीती वाटलीच नसती तर आपण सरळ आगीत चालत गेलो असतो किंवा दरीत उडी मारली असती किंवा सिंहाच्या पुढ्यात जाऊन बसलो असतो आणि नष्ट झालो असतो. असंच इतर भावनांचं.

याच सुमाराला भावना आणि मनोविकार यांचा मेंदूतल्या प्रक्रियांबरोबरचा संबंध यांच्याविषयी बरंच वाचनात आलं. त्यामध्ये सुझन ग्रीनफील्ड, जॉन मॅक्रॉन, व्ही. एस. रामचंद्रन, रॉबर्ट विन्स्टन, रिचर्ड रेस् टक, स्टीव्हन पिंकर, ऑलिव्हर सॅक्‍स अशा अनेक मोठमोठ्या लेखकांची आणि संशोधकांची प्रत्येकी दोन-तीन पुस्तकं हातात पडली. आपला मेंदू 10,000 कोटी न्यूरॉन्सनं बनलेला आहे. हे न्यूरॉन्स एकमेकांना जोडून त्यांचं एक जाळं बनलेलं आहे. मेंदूत निर्माण होणारा कुठलाही संदेश हा विद्युतरासायनिक प्रक्रियेनं एका न्यूरॉनपासून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे असं करत करत अनेक न्यूरॉन्स मध्ये पसरतो. तो मेंदूतल्या ज्या भागात पसरतो तो भाग किंवा त्यातले न्यूरॉन्स हे "फायर' झाले आहेत, असं आपण म्हणतो. आपल्या वेगवेगळ्या भावनांमुळे मेंदूतल्या वेगवेगळ्या भागातले न्यूरॉन्स फायर होतात, तसेच मेंदूतल्या रसायनांच्या कमी-जास्त होण्यामुळे अनेक मनोविकार उद्‌भवतात. आज एमआरआय, पीईटी, ईईजी अशांसारख्या तंत्रांचा वापर करून मेंदूचे सखोल स्कॅन्स घेऊन मेंदूच्या कुठल् या भागात काय चाललंय, हे हळूहळू कळायला लागलं आहे. थोडक्‍यात, आपल्या डोक्‍यात आलेला कुठलाही विचार किंवा भावना किंवा आपल्याला झालेला कुठलाही मनोविकार याचा मेंदूच्या स्कॅनशी संब ंध लावणं थोडंफार शक्‍य होतंय. उद्या जर हे तंत्र खूपच प्रगत झालं तर केवळ या स्कॅन्सकडे पाहून त्या माणसाच्या मनातल्या भावना, एवढंच काय, पण डोक्‍यातले विचारसुद्धा कळू शकतील की काय, अशी एक कल्पना पुढे यायला लागली. एकदा तर मानसशास्त्राची जागा हळूहळू मेंदूविज्ञानच घेईल आणि सगळ्यात शेवटी कित्येक वर्षांनी फक्त मेंदूविज्ञानच उरेल, असं वाटायला लागलं होतं. कुठलाही म नोरुग्ण आला, की त्याच्या मेंदूचे स्कॅन्स काढून त्याचा मनोविकार ओळखायचा आणि मग तो बरा करण्यास
ाठी त्याला फक्त गोळ्या देऊन त्याच्या मेंदूतली रसायनं बदलायची, की काम झालं, असं चित्र उद्या निर्माण होईल, असं वाटायला लागलं होतं. मग माणसाचं मन कसं चालतं? त्यातल्या भावना का आणि कशा निर्माण होतात, याचा अभ्यास करण्याची, म्हणजेच थोडक्‍यात, मानसशास्त्राची तरी गरजच काय, असंही वाटायला लागलं होतं.

पण नंतर यातला फोलपणा लक्षात यायला लागला. एखाद्या माणसाच्या मेंदूचा स्कॅन घेऊन तो चिंताग्रस्त आहे हे एकवेळ कळू शकेल; पण त्याला ती चिंता घटस्फोट झाल्यामुळे वाटते आहे, का बेरोजगारीमुळे वाटते आहे, का त्याच्या मुलाच्या आजारामुळे वाटते आहे, हे त्या मेंदूच्या स्कॅनवरून कळण्याची आज तरी सोय नाही आणि उद्याही ती सहजासहजी असेल असं वाटत नाही. म्हणजे थोडक्‍ यात, आपल्या मनात ज्या भावना निर्माण होतात त्यांचा सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीशी असलेला संबंध तपासून बघण्याची गरज होतीच आणि इथे मेंदूविज्ञान थिटंच पडत होतं. मानसशास्त्राच्या अ भ्यासाची गरज थोडक्‍यात अबाधितच होती.

हे सगळं कळल्यानंतर आणि या मानसिक द्वंद्वानंतर मग मानसशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. मानसशास्त्राचा अभ्यास करताना ग्रीकांनी अतिप्राचीन काळापासून घेतलेला मेंदू अभ्यासाचा शोध जाणून घेता आला. मनोविकार झालेल्या रुग्णांसाठीची खास रुग्णालयं आणि मनोरुग्णांवर होत असलेल्या अघोरी प्रकारांनी अंगावर अक्षरशः काटा आला. भारतीय संस्कृतीत वेदांपासून ते अनेक संतांनी मनाचा वेध घेण् याचा प्रयत्न केला होता, तर पाश्‍चिमात्य संस्कृतीत फ्रॉईड हा मानसशास्त्रज्ञ युगप्रवर्तक ठरला. त्यानं मनुष्याला पडलेल्या स्वप्नांचे अर्थ शोधून मनाच्या तळापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. मानसशास्त्रातलं स ंशोधन आणि त्यातले चित्रविचित्र प्रयोग चित्तथरारक होते. या प्रवासात मेस्मर, शार्को, फ्रॉईड, युंग, पॅव्हलॉव्ह, वुण्ड, थॉर्नडाईक, वॉटसन, स्किनर, टोलमन, हल, एरिकसन, एलिस, पिअँजे यांच्यासारखे विलक्षण मानसशास्त्रज्ञ भेटले. त्यांची रंजक चरित्रं आणि त्यांचं कार्य तपासून बघता आलं. मानसशास्त्र उलगडताना जेस्टॉल्ट सायकॉलॉजी, पर्सनॅलिटी सायकॉलॉजी, बिहेवियरल सायकॉलॉजी, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी अशा मानसशास्त्राच्या विविध शाखा आणि त्यातल्या वेगवेगळ्या थेरपीजचा अभ्यास करता आला. ही चरित्रं, या थिअरीज आणि सिस्टीम एकत्र करून सुसूत्रपणे आदिमानवापासून आतापर्यंतचा मानसशास्त्राचा इतिहास रंगवावा, त्याच वेळी त्यातली तत्त्वंही सांगावीत आणि ती मांडणारी माणसं, त्यांच्यातले वाद, त्यांच्यातल्या मारामाऱ्या, त्यांच्या आयुष्यातली वादळं, त्यांना मिळणारी योग्य-अयोग्य नोबेल पारितोषिकं यांच्याही रंजक कहाण्या या सगळ्यांसकट सोप्या भाषेत उभ्या कराव्या, असं वाटलं. यासाठी मग मी पुस्तकच लिहायला घेतलं आणि त्याची 500-550 पानं लिहूनही तयार झाली. तेवढ्
यात "सप्तरंग'बरोबर या मालिकेबद्दल बोलणं चालू झालं आणि मग "सप्तरंग'चं नवीन आकर्षक स्वरूप बघून मीही त्याला मान्यता दिली आणि ही मालिका चालू झाली.

आता मात्र मी ही मालिका संपवतोय. आणि याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे वाढलेला कामाचा आणि प्रवासाचा व्याप, दुसरं म्हणजे मानसशास्त्राचं सविस्तर, मोठं पुस्तक जास्त लवकर प्रकाशित होण् याची गरज आणि इच्छा! अर्थातच दर महिना-दोन महिन्यांनी एकदा तरी वेगवेगळ्या विषयांवर "सप्तरंग'मध्ये लेख लिहिण्याच्या अटीवर "सप्तरंग'नंसुद्धा माझं हे म्हणणं मोठ्या मनानं स्वीकारलं. या प्रक्रियेमध्ये अक्षरशः शेकडो वाचकांचे ई-मेल, फोन आणि एसएमएस आले. काही तर प्रत्यक्ष येऊन भेटले. त्या सगळ्यामुळे मला खूपच प्रोत्साहन मिळालं आणि लोकांमध्ये एकूणच या विषयाविषयी किती प्रचंड उत् सुकता आहे, याची मला जाणीव झाली आणि नवीनच हुरूप चढला.

मनोविकारांविषयी लिहायचं म्हणून मी चक्क "ऍबनॉर्मल सायकॉलॉजी' या विषयाची 600-700 पानी मोठ्या आकाराची पाच-सहा पुस्तकं आणून वाचायला सुरवात केली, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे अलीकडे मनोविकारांचं प्रमाण खूपच वाढतंय. समाजात असलेली प्रचंड स्पर्धा, विभक्त कुटुंबपद्धती, आई-वडील आणि मुलगा किंवा नवरा आणि बायको यांना एकत्र राहणं किंवा एकत्र वेळ काढणं हे कठीण होऊन बसणं, रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत तणावपूर्ण कामाचं स्वरूप, कामाचा खालावलेला दर्जा, नोकरीतलं अस्थैर्य, वाढणारी बेरोजगारी, सतत होणारं स्थलांतर, टोकाचा युक्तिवाद, ज्ञान, सुसंस्कृतपणा, माणुसकी आणि समता, बंधुत्व यांच्याऐवजी पैसा, स्वार्थ, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या मूल्यांमध्ये लडबडलेला समाज, त्याच ध्येयानं अहोरात्र परिश्रम करणारी पण त्यातल्या काहींनाच ते साध्य झाल्यामुळे इतर लाखो-कोट्यवधींना नैराश्‍यात ढकलणारी ही समाजव्यवस्था, मैत्री आणि नाती पैशांच्या तराजूमध्ये क्षणभंगुर ठरल्यामुळे येणारा गर्दीतलाही एकाकीपणा या सगळ्यामुळे मनोविकारांचं प्रमाण हे गेल्या 20-30 वर्षांत प्रचंड वाढलं. "वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या अहवालाप्रमाणे काहीच वर्षांत साधारण 24 टक्के माणसं या ना त्या लहान-मोठ्या मनोविकारांनी त्रस्त असतील असं भाकीत आहे आणि हे औषधांच्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पथ्यावरच पडणार आहे. कारण त्यांची नैराश्‍य आणि इतर मनोविकारांवरची औषधं भरमसाट खपणार आहेत. हे विकार जास्त तीव्र करणाऱ्या समाजव्यवस् थेवर टीका करून त्यात सुधारणा करण्याऐवजी उलट मनोरुग्णांवर औषधांचा मारा करत राहणं, हे या बहुराष्ट्रीय कंपन्यांना फावणारच आहे. या सगळ्यांविरुद्ध एक चळवळ निर्माण करून एक सुसंस्कृत, सम ाधानी, सुसंवादी समाज निर्माण करण्याची आज गरज आहे, हे मात्र खरं! बाय बाय!

No comments:

Post a Comment